शनिवार, ११ एप्रिल, २०१५

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले

जन्म: इ.स. १८२७ कटगुण,
सातारा ,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८ , इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र
वडील: गोविंदराव आई: चिमणाबाई पत्नी:
सावित्रीबाई फुले
महात्मा जोतिबा फुले (इ.स. १८२७ - नोव्हेंबर
२८ , इ.स. १८९०) हे मराठी , भारतीय
समाजसुधारक होते.
बालपण त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा)
होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव.
कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे
आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे
सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले
व होले
आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या
वडिलांचे
नाव गोविंदराव आणि आईचे नाव
चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या
पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण
देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली
भारतातील
पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई.
त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी
शाळा काढणारे
महात्मा फुले पहिले भारतीय होत.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा
अभ्यास होता.
अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले.
त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान
होते.
आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील
कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा
अप्रकाशित ग्रंथ आहे.
सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ
त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित
झाला.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली.
पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून,
अत्याचारापासून व
गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र
समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची
जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय
होते.
जय ज्योती
महात्मा फुले
एक क्रांतिकारी वादळ
जीवनपट
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
जोतीराव गोविंदराव फुले
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
प्रभाव: थॉमस पेन
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ -
नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी,
भारतीय लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली. शेतकरी आणि बहुजन
समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन
पुरोगामी विचारांची मांडणी
केली. महाराष्ट्रातील
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ
रोवली. त्यांनी आपल्या
पुरोगामी विचारांची निर्भयपणे
मांडणी केली व स्वत:चे विचार
आचरणात आणले.
बालपण आणि शिक्षण
जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते.
गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर
तालुक्यातील खानवडी येथे आला..
तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.
खानवडी येथे फुले व होले
आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव
चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा
जिल्ह्यातील कटगुण या गावी ११
एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले
विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते
ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ
त्यांनी भाजी विक्रीचा
व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी
पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी
प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे
पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून,
अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित
शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना
हक्काची जाणीव करून देणे हे
सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्ष
ी जगत्पती । त्याला नकोच
मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज
उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक
पुनर्रचनेची मागणी
केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह
लावण्यास सुरुवात केली. मराठीत
मंगलाष्टके रचली. समाजातील
विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत
शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे
महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील
ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ विद्येविना मती गेली। मतिविना
नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

जोतीरावांनी त्यांच्या
पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन
शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या
मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली
भारतातील पहिली महिला म्हणजे
सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त
स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले
भारतीय होत.
\
या लेखातील खाली दिलेला
अनुक्रमणिकेपर्यंतचा मजकूर [१] येथून कॉपी-
पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार
संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय
हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे
संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
(०१ फेब्रुवारी २०१४)
वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे
शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या
विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष
प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि
समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ
होत असत. ही सामाजिक परिस्थिती
सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे
आपल्या पत्नी सावित्रीबाईंना
त्यांनी साक्षर केले. १८४८ साली
पुण्यामध्ये पहिली
मुलींची शाळा काढून
तेथील शिक्षिकेची
जबाबदारी सावित्रीबाईंवर
सोपविली. महाराष्ट्रातील
स्त्री शिक्षणाची ही
मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य
मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये
त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या
या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण
जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज
सुधारण्याच्या कार्याला गती
देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी
१८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक
समाजा’ची स्थापना केली.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला
नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही
निर्मिती मानवाचीच आहे’ असे
रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची
निर्मिती करणारी कोणती
तरी शक्ती आहे
अशी त्यांची
(अस्तिक्यवादी) विचारसरणी
होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत
होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या
पुस्तकातून महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि
दारिद्रयाची वास्तवता विशद केली
आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून
ही जोतीरावांचे दर्शन होते.
‘नीती हाच मानवी
जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे
जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व
म्हणूनही आपल्यासमोर येतात.
साहित्य आणि लेखन
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ
मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू'
हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा
अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर
त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक
विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी'
ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना
त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची
कैफियत' हा महात्मा  फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक
सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१
मध्ये प्रकाशित झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा